Tuesday, April 28, 2020

ब्लॉग निर्मिती- मुंडे सर

ब्लॉग कसा तयार करावा .
ब्लॉग तयार करण्याविषयी खालील सविस्तर कृतियुक्त माहिती .

1  ब्लॉग तयार करण्यास स्वत:चा  Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2  प्रथमतः www.blogger.com वर जा.
3  तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.
4  यानंतर New Blog ला click करा.
5  पुढे Blog चे title  व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g   ( bhimraomunde.blogspot.com]
6  त्याखालील हवे ते Template निवडा .
7  create blog ला click करा .
8 निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .
9  आता new post वर click करा .
10  MSWord प्रमाणे Page open होईल .
11  तेथे आपली post तयार करा .
12 नंतर publish करा .
13  समोरील view blog करून आपली blog website पहा .
14  नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15  त्याखालील gadget वर क्लिक करा .
16  त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17  हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18  Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19  माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20  नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21  आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22  layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23  शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24  खाली तुम्हाला live blog दिसेल .
25   सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26  आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता


अधिक माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या
 https://bhimraomunde.blogspot.com/2020/04/blog-post.html?m=1

Google फॉर्म द्वारे Quiz निर्मिती

✒🌹✒


*गुगल फॉर्म च्या माध्यमातून क्विझ तयार करणे*


१. सर्वप्रथम क्रोम ब्राऊझर वर जाऊन Google forms टाईप करावे.


२. गुगल फॉर्म ओपन होईल , go to Google form त्यावर जाऊन + या ऑप्शन वरून नवीन गुगल फॉर्म ओपन करावा.


३. गुगल फॉर्मवर क्विझ तयार करावयाची असल्यामुळे फार्म ओपन होताच फॉर्मच्या सेटिंग मध्ये जावे तेथे 3 विंडो असतील . त्यामध्ये पहिली जनरल , दुसरी प्रेझेंटेशन आणि तिसरी क्विझची असेल. क्विझ वर क्लिक करा .


४. Make this quiz हे ऑप्शन ऑन करा व सर्वात खाली जाऊन सेव्ह करून घ्या . आपण क्विझ तयार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकलेले आहे.


५. जो untitle form आलेला आहे त्याला नाव द्या व डिस्क्रिप्शन मध्ये कोणत्या वर्गाची , कोणत्या धड्यावर आधारित क्विझ आहे ते टाकायला विसरू नका .


६. किमान दहा प्रश्न क्विझ मध्ये असणे अनिवार्य आहे त्यासाठी प्रश्नाचे जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी मल्टिपल चॉइस ,  ड्रॉप-डाऊन , चेक बॉक्स किंवा शॉर्ट आन्सर घेतल्यास उत्तम .


७. मल्टिपल चॉइस घेतल्यास उत्तरा दाखल कमाल चार पर्याय निवडणे गरजेचे आहे .


८. प्रत्येक प्रश्नाच्या खाली आन्सर की असे लिहिलेले आहे त्यावर क्लिक करून बरोबर उत्तर निवडायची आहे तसेच उजव्या बाजूला पॉईंट्स लिहिलेले आहे तिथे त्या प्रश्नाचे गुण द्यायचे आहेत.


९. डाव्याबाजूला आंसर फीडबॅक असे लिहिलेले आहे त्यावर क्लिक करा ,  करेक्ट आन्सर लिहिलेले असेल ते निवडून आपला फीडबॅक आपण नोंदवू शकतो . म्हणजे विद्यार्थ्यांचे उत्तर जेव्हा बरोबर येईल तेव्हा आपण नोंदविलेला फीडबॅक त्यांना दिसेल .


१०. संपूर्ण चाचणी तयार झाल्यानंतर उजव्याबाजूला तीन टिंब दिसतील . ते मोअर सेटींग चे टिंब आहेत . त्यावर क्लिक करा , एक लिस्ट येईल त्यामध्ये ॲड वन्स वर क्लिक करावे . त्यानंतर नवीन विंडो ओपन होईल त्यावर cerfity em असे दिसेल ते डाऊनलोड करून घ्या.


११. डाउनलोड झाल्यानंतर certify em चा लोगो सेटिंग च्या अलीकडे पहिल्या क्रमांकावर दिसेल . त्यावर क्लिक करा . जी विंडो ओपन होईल त्यामध्ये सर्टिफिकेट इज ऑफ ला अॉन करून घ्यावे . रेकॉर्ड सुद्धा येथेच दिसणार आहे . त्यानंतर किती टक्क्यावर आपण विद्यार्थ्यांची पासिंग ठरवायची आहे ते क्लिक करून तेवढ्या परसेंटेज वर ठरवून घ्यावे . त्याखाली सर्टिफिकेट कुठल्या प्रकारचे पाहिजे त्यावर क्लिक करून आपल्या आवडीचे सर्टिफिकेट निवडून घ्यावे .


१२. ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये ज्या सूचना आहेत त्या वाचून आपण नोंदवून घ्यायचे आहेत . विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट ऑनलाइन द्यायचे हे सेटिंग आहे ते सेव्ह करून घ्यावे .


१३. त्यानंतर ही क्विझ सेंड करायची आहे . त्यानंतर आलेली लिंक शॉर्ट करून कॉपी करायची आहे व व्हाट्सअप वर या भागाशी संबंधित एक पोस्ट तयार करून आपल्याला आप आपल्या गृप वर सेंड करायची असते.


१४. रिस्पाॅसेस मध्ये जाऊन आपण विद्यार्थ्यांची उत्तरे पाहू शकतो तसेच हिरव्या रंगाचे अधिकचे चिन्ह आहे त्यावर क्लिक करून स्प्रिडशीट मध्ये सुद्धा माहिती संकलित करू शकतो.


१५. विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळत असल्यामुळे त्यांचा आनंद सुद्धा द्विगुणीत व्हायला मदत होते .


©️ *ही पोस्ट माझ्या शिक्षक बांधवांना  क्विझ तयार करण्यासाठी मदत व्हावी म्हणून तयार करण्यात आलेली आहे , कृपया फॉरवर्ड करताना ही जशीच्यातशी फॉरवर्ड करावी*


*प्रशांत शेवतकर*

*_जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी केंद्रशाळा हातोला_*

9637046140


✒🌹✒

Sunday, April 26, 2020

अक्षय तृतीया.

अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे 
* या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी.
* सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.
* ब्राह्मण भोजन घालावे.
* या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवे.
* या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावे.
* साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.
शास्त्रांमध्ये अक्षय तृतीया
* या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.
* या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.
* नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.
* श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.
* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होतात आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.
अक्षय तृतीयेचे माहात्म्य
* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.
* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.
* शुभ कार्ये या दिवशी होतात.
* श्रीकृष्णाने युधीष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षयतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते.

Friday, April 24, 2020

लोकसत्ता अग्रलेख

 लोकसत्ता मधील लेख

विचार करून डोके शिणल्यावर कुटुंबाच्या काळजीसाठी विरंगुळा म्हणून थोडे बाहेर पडले, जास्तीची खरेदी केली तर या थोडय़ा जास्तीला लगेच ‘साठेबाजी’ म्हणावे?
मध्यमवर्गाचे कूळ व मूळ काय, असले फिजूल प्रश्न विचारण्याची ही वेळ नाही. सर्व जाती, धर्माचा समावेश असलेला हा वर्ग तसा राष्ट्रभक्त आहेच. थाळी वाजवणे, दिवे घालवणे व लावणे असल्या राष्ट्रकार्यात त्याचा सहभाग असतोच. हे काय राष्ट्रकार्य आहे का, असा प्रश्न कुणी उपस्थित केलाच तर त्याला तावातावाने उत्तर देण्यातसुद्धा हा वर्ग समोर असतो. त्यामुळे त्याच्या भक्तीविषयी शंका घेणे तसे चूकच. या वर्गाचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. तो सदैव नियमांचे पालन करतो, इतरांना नियमांचे पालन करायला लावतो. जे करत नाहीत त्यांच्यामुळे अस्वस्थ होतो. तर अशा या वर्गाकडून एखादवेळ चूक घडलीच तर त्याचा किती बाऊ करायचा. याला काही धरबंद आहे की नाही! सध्याच्या टाळेबंदीच्या काळात मोठय़ा प्रमाणावर कापडी पिशव्या घेऊन बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी जाणारा वर्ग हाच आहे असा जावईशोध कुणीतरी लावला व नाहक या वर्गास बदनाम व्हावे लागले. हा वर्ग सध्याच्या संकटाच्या काळात एवढय़ा भाज्यांची बेगमी कशासाठी करतो? तिकडे गरिबांना अन्न मिळत नसताना स्वत:ला संवेदनशील समजणाऱ्या या वर्गाने एवढी घाऊक खरेदी करण्याची गरज काय? यांच्या घरातल्या भाज्या रोजच्या रोज संपतात तरी कशा? दर आठवडय़ाला खाद्यतेलाचे पिंप घेऊन हा वर्ग घरात नेमके काय तळतो? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करून काही कुंठित मनांनी या वर्गास बेजार करून सोडले आहे. मुळात हे असे हल्ले करणाऱ्या जमाती अनेक गोष्टींतील कार्यकारणभाव समजून घेत नाहीत. यामागचे नेमके इंगित काय तेही लक्षात घेत नाहीत.

चार्वाकाचा विवेक विचार

चार्वाकाचा विवेक विचार

मला आवडलेली Whats app post आहे.

चिंतन :*

*लेखक –डॉ.आ.ह.साळुंखे*

*५.विवेक वापरण्याचा अधिकार ही मोठी देणगी*

प्राचीन भारतात निर्माण झालेल्या दर्शनांमधे *चार्वाक दर्शनाचं* स्थान
अनेक कारणांनी आगळं-वेगळं होतं. जीवनाचा प्रवास करताना आपल्यासमोर जे
काही येतं,त्याची चिकित्सा करावी, जे आपल्या बुद्धीला, विवेकाला पटेल, ते
घ्यावं आणि बाकीचं बाजूला सरावं, या वास्तव भूमिकेवर हे दर्शन उभं होतं.
आपली ही भूमिका लोकांना पटवून देण्यासाठी हे दर्शन मानणाऱ्या एका
तत्ववेत्त्यानं केलेला एक प्रयोग मोठा लक्षणीय होता. किंबहुना, नुसता
लक्षणीयच नव्हे, तर अनुकरणीय,अनुसारणीय होता.
जुन्या परंपरेत वाढलेले लोक त्याची *चिकित्सेची भूमिका* मानायला तयार
नव्हते. स्वतः त्याची पत्नी त्याच्याशी सहमत नव्हती. अखेरीस एके दिवशी
मध्यरात्री तो आपल्या पत्नीला घेऊन गावाच्या वेशी जवळ गेला. तिथून
धुळीच्या रस्त्यावर हाताचे पंजे विशिष्ट पद्धतीनं उठवत उठवत तो गावातील
चौकापर्यंत आला. सकाळी उजाडताना पुन्हा पत्नीला घेऊन चौकात आला. त्या
रस्त्यानं जाणारे लोक धुळीतील खुणा पाहून एकमेकांत चर्चा करू लागले.
लांडग्यांच्या पावलाचे ठसे आहेत, असं म्हणू लागले. रात्रीच्या वेळी
लांडगा येतोय, अशी अफवा पंचक्रोशीतील घराघरातून पसरली. हे सगळं चार्वाक
आणि त्याची पत्नी यांच्या समोर घडलं. अखेरीस त्यांनं तिला तिला विचारलं,
“या धुळीत हे काय आहे?” ती म्हणाली, ‘हे तुमच्या हाताचे ठसे आहेत!’ तो
म्हणाला, असं कसं म्हणतेस? या पंचक्रोशीतील कुणालाही विचार. हे
लांडग्याच्या पावलाचे ठसे आहेत, असंच तुला ऐकायला मिळेल.” यावर ती
म्हणाली, “पंचक्रोशीतील काय, सर्व जगातील लोकांनी येऊन मला तसं सांगितलं,
तरी मी ते खरं मानणार नाही. कारण, हे ठसे तुम्ही आपल्या हातांनी
उठवल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे.” *चार्वाक म्हणाला, याचा अर्थ लोक जे काही म्हणतात, ते तू स्वतःच्या अनुभवाच्या कसोटीवर तपासून पाहिलंस आणि जे त्या कसोटीवर टिकलं नाही, ते तू स्वीकारलं नाहीस!* इतकी वर्ष मी
तरी तुला दुसरं काय करायला सांगतोय?”
चार्वाकाचा हा प्रयोग म्हणजे तुम्हा-आम्हा भारतीयांना मिळालेला
*विवेक-प्रामाण्याचा* एक महान वारसा आहे, असं मला वाटतं. या
प्रयोगासारखाच विचार कालिदासानंही एकदा मांडला आहे. मालविकाग्निमित्र या
नाटकात तो म्हणतो,”काव्य जुनं आहे, एवढ्यावरून ते सगळं उत्तम ठरत नाही
आणि नवं आहे एवढ्यावरून निंद्यही ठरत नाही.विवेकी लोक परीक्षा करून
दोहोंपैकी एकाचा स्वीकार करतात. मूर्ख मनुष्य दुसऱ्याच्या अनुभवला
अनुसरून आपली बुद्धी चालवतो.”
*आपली बुद्धी वापरण्याचं स्वातंत्र्य, आपला विवेक वापरण्याचा अधिकार ही निसर्गानं माणसाला दिलेली मोठी देणगी आहे.* आपली बुद्धी वापरायची, याचा
अर्थ दुसऱ्याकडून काही शिकायचंच नाही किंवा इतरांना हिणवून स्वतःच्या
बुद्धीचा गैरवाजवी अहंकार बाळगायचा, असा मात्र नाही. उलट, आपली बुद्धी
नम्रपणानंच वापरायची. ती अहंकारानं डगाळून टाकायची नाही. ज्ञानामुळं
येणाऱ्या अहंकाराचं वर्णन करताना *संत तुकारामांनी म्हटलं आहे, ‘कोढियाचे गोरेपण। तैसे अहंकारी ज्ञान।’* बुद्धीचा अहंकार तर बाळगायचा नाही, पण
आपली बुद्धी दुसऱ्याकडं गहाणही टाकायची नाही, असा *सुवर्णमध्य साधणं* हे
या याबाबतीत आपलं ध्येय असलं पाहिजे.
आपली बुद्धी स्वतंत्रपणानं वापरणं, हे अनेक माणसांना अवघड वाटतं, जड
जातं, हे मात्र खरं आहे. तसं करणं त्यांना असुरक्षित पणाचं वाटतं.
त्यामुळं स्वतःच्या डोक्यावर जबाबदारीचंओझं येतं. अपयशाची, पराभवाची भीती
वाटते. त्यामुळं चाकोरीचा सुरक्षित मार्ग स्वीकारून सुखासमाधानानं जागावं
असं त्यांना वाटतं. पण अशा प्रकारचं सुखसमाधान हा आपल्या मानव्याचा अपमान
आहे, असं मानून *जे लोक स्वातंत्र्याबरोबर येणारं जबाबदारीचं ओझं पेलायला सज्ज होतात, तेच इतिहास घडवतात.समाजाला नवं वळण लावतात.मानवी संस्कृतीवर आपला ठसा उमटवतात.* समाज अशा लोकांकडं आधी संशयानं पाहतो, त्यांना विरोध
करतो,पण नंतर तो त्यांनाच अभिमानानं डोक्यावर घेऊन नाचतो कृतज्ञतेनं
त्यांच्यापुढं नम्रही होतो.

📰📓📔📒📕📗📘📙📚📖✒️